शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा; ॲड. शंकर चव्हाण यांचे प्रतिपादन

पुणे (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ मिरवणुका, डीजे आणि नृत्यात न साजरी करता त्यांच्या विचारांचा अभ्यास करून, इतिहास वाचून आणि त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करून साजरी केली पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. शंकर चव्हाण यांनी पुणे येथे आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात केले. “शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा,” हा स्पष्ट संदेश […]

सविस्तर वाचा

सिंहस्थ कुंभमेळा शिर्डीच्या विकासाची पर्वणी !

जनशक्ती (वृत्तसेवा)-  त्र्यंबकेश्वर येथे आगामी २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी केवळ कागदावर न राहता ती आता प्रत्यक्षात जमिनीवर उतरत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणारा प्रत्येक भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोच, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन शिर्डीतील नियोजनाला नाशिकइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साई सभागृहात नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली […]

सविस्तर वाचा

काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने दिला सैनिक वडिलांना अखेरचा निरोप

जनशक्ती (वृत्तसेवा)- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे. प्रमोद जाधव […]

सविस्तर वाचा

महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट; राज्यातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या 

जनशक्ती (वृत्तसेवा)-  राज्याच्या महसूल विभागातील ४७ अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तब्बल गेल्या १० वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून  शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे. तत्पूर्वी […]

सविस्तर वाचा

धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? आजचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर…

जनशक्ती (वृत्तसेवा)- धनत्रयोदशीला महालक्ष्मी माता, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. या दिवशी पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया… पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी महालक्ष्मी माता आणि […]

सविस्तर वाचा

दसरा व इतर सणांना झेंडूचीच फुलं का वापरली जातात? काय आहे कारण?

जनशक्ती (वृत्तसेवा)- दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा. या दिवशी घरांची सजावट झेंडूच्या फुलांनी केली जाते. तसेच घरातील गाड्या, यंत्रे, मशिनरी यांची पूजा करून त्यांनाही झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलं जातं. दसरा तसेच इतर हिंदू सणांमध्ये झेंडूच्या […]

सविस्तर वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारामुळे तरुणांना सीआयआयआयटीद्वारे औद्योगिक संधी – ॲड. शंकर चव्हाण

बीड (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील तरुणांच्या भवितव्याला दिशा देणारी, रोजगाराच्या संधी उभारणारी आणि कौशल्य विकसनाला चालना देणारी ऐतिहासिक घडामोड नुकतीच घडली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष पुढाकाराने बीड जिल्ह्यात ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ (CIIIT) उभारण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने १९१ कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे […]

सविस्तर वाचा

खूशखबर! महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसणार 

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला […]

सविस्तर वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट; पारा पोहचला ४० अंशावर

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं दिसत आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ३५ ते ४० अंशावर पोहचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर काही भागात ४२ ते ४३ अंशापर्यंत तापमान […]

सविस्तर वाचा

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्र सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार, २४ जानेवारीच्या सायंकाळपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ […]

सविस्तर वाचा